Post scheme double राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समाधी काय पोस्टाच्या योजनेमध्ये तुम्ही जर या गुंतवणूक केली तर तुमचे पैसे डबल होतील नेमकी कोणती योजना आहे आणि याचा आपल्याला लाभ कसा मिळेल यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा हे पात्रता कशी बघुयात माहिती
Post scheme double संपूर्ण माहिती
मनुष्य जीवनामध्ये आपण आपले पैशांची गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो कोणी जमीन घेते कोणी सोने घेते कोणी चांदी घेत असतो त्याचप्रमाणे कोणी पैशांचे गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करत असतो पण एफडी करत असतात परंतु तुम्हाला माहिती आहे का पोस्टाच्या एका योजनेमध्ये तुम्ही जर पैसे लावले तर तुमचे पैसे हे वर्षातच डबल होतील कोणती योजना आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होईल कशाप्रकारे फायदा होईल याची माहिती आपण आज घेणार आहोत
Post scheme double पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली असली तरी पोस्ट ऑफिसनं आपल्या कोणत्याही योजनेच्या व्याजदरात कपात केलेली नाही. पोस्ट ऑफिस एक योजना देखील चालवते ज्यामध्ये आपले पैसे थेट दुप्पट होतात. आज आपण येथे पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये तुमचे पैसे ठराविक कालावधीत थेट दुप्पट होतात.
किसान विकास पत्र ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे थेट दुप्पट होतात. आपण या योजनेत गुंतवलेले सर्व पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिसच्या केव्हीपी योजनेत एकरकमी गुंतवणूक केली जाते. या योजनेवर सध्या ७.५ टक्के व्याज मिळत आहे. किसान विकास पत्र योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपये जमा करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच त्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला९ वर्ष ७ महिन्यांत योजना मॅच्युअर होते
पोस्ट ऑफिसची ही योजना ११५ महिन्यांत म्हणजेच ९ वर्ष ७ महिन्यांत मॅच्युअर होते. म्हणजेच या योजनेत जमा झालेले तुमचे पैसे ११५ महिन्यांत दुप्पट होतात. ही एक निश्चित परतावा योजना आहे आणि ती पूर्ण गॅरंटीसह निश्चित परतावा देते. या योजनेत एकच खातं तसंच संयुक्त खातंही उघडता येतं. जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ३ लोकांना खातं उघडता येतं. ही पोस्ट ऑफिसची योजना आहे आणि पोस्ट ऑफिस केंद्र सरकार चालवतं. याचा सरळ अर्थ असा होतो की या योजनेत गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत.